“शेवटी खऱ्या आयुष्यात जब्याला मिळाली शालू! लग्नानंतरचा फोटो पाहून चाहते चक्रावले…”
"शेवटी खऱ्या आयुष्यात जब्याला मिळाली शालू! लग्नानंतरचा फोटो पाहून चाहते चक्रावले…"

मुंबई – ‘फँड्री’ या गाजलेल्या चित्रपटातून आपल्याला परिचित असलेली जोडी – जब्या आणि शालू – पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र यावेळी कारण थोडं वेगळं आहे.
सोशल मीडियावर त्यांच्या लग्नानंतरचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे, आणि त्यावरून चर्चा सुरू आहे की, हे दोघं खऱ्या आयुष्यातही एकत्र आले आहेत का?
शालू म्हणजेच राजेश्वरी खरात आणि जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे हे दोघं सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात.
नुकतेच राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर सोमनाथसोबतचे काही खास फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती गुलाबी साडी नेसून, सोमनाथसोबत अगदी रोमँटिक अंदाजात दिसतेय.
या पोस्टच्या कॅप्शनने तर एक वेगळीच चर्चा पेटवली – “अजूनही वाटतं, स्वप्न आहे सगळं.” हे वाचून चाहते गोंधळलेत – खरंच लग्न झालंय का या दोघांचं?
फोटो व्हायरल होताच, चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. काहींनी तर मजेशीर अंदाजात म्हटलं – “शेवटी काळी चिमणी घावली!”
‘फँड्री’मधील यांचं गावरान प्रेम प्रेक्षकांच्या मनात आजही जिवंत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र आली, तर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटेल हे नक्की!